TOD Marathi

मुंबई : ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakreay ) यांच्या कालच्या औरंगाबाद (Aurangabad ) सभेवर लगावला आहे.

ट्विटरवर ट्विट (Tweet by Sandeep Deshpande) करत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला फक्त लवंगीच्या फुसक्या माळा म्हणत खिल्ली उडविली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. औरंगाबाद शिवसेनेच्या ३७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वाभिमान सभेत ते बोलत होते. (Swabhiman Sabha )

दरम्यान ‘काश्मिरी पंडित (Kasmiri Pandit) घर सोडून निघून जात आहेत. त्यांना हवी ती मदत करायला महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goverment ) तयार आहे. पण, चांगले काम करणाऱ्यांच्या मागे ‘ईडी’ ( ED) आणि सीबीआयचा ) (CBI) ससेमिरा लावला जातो. खरेच काही वाटत असेल तर तिकडे काश्मिरात तपास यंत्रणांचा उपयोग करा, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर (BJP) चांगलच आगपाखड केली.